महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. पाणीसाठा वाढत असल्याने राधानगरी धरणाचे रविवारी तीन दरवाजे उघडले. सहा नंबरचा दरवाजा रविवारी सकाळी दहा वाजून 55 मिनिटाला उघडला. दुपारी दोन वाजेपर्यंत आणखीन दोन राजे उघडले. धरणाचे तीन दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणातून 5888 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा दिला आहे. गेले दोन दिवस कोल्हापूरसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. रविवार सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.